आशा भोसले आणि ओ पी नय्यर ....
ओपींच्या “आईये मेहेरबान” ला आशाने आपल्या आवाजात प्रतिसाद दिला आणि ओपींना एक सोनसळी मखमली आवाज गवसला ... तर आपल्याच मोठ्या बहिणीच्या लता मंगेशकरच्या सावलीत झाकोळून गेलेल्या आशाच्या आवाजाला ओपींच्या स्वरुपात अत्माविशावासाची , नवचैतन्याची साथ मिळाली .....
"मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूँ
मगर चाँद तारे मुझे जानते है "
म्हणत आशाने जणू ओपींना आश्वासनच दिलं ....
ओपी आणि आशा म्हणजेच सुपर सुपर हिट गाणं असंच समीकरण झालं ....
त्या दोघांच्याच गाण्यांचं एक आगळं विश्व आहे .....
त्या विश्वाचे लाखो करोडो चाहते आहेत .....
आशाचा आवाज अतिशय व्हर्सटाइल आहे हे तर सगळेच जाणतात ......
पण ओपींकडे गाताना आशाचा आवाज जास्तच खास लागत असे ....
“ये क्या कर डाला तुने” अशी लाडिक कबुली
“बेईमान बालमा मान भी जा” मधलं गोड आर्जव
“आंखो से जो उतरी है दिल में” मधली धुंदी
“वो हसीन दर्द दे दो जिसे मैं गले लगा लू“ – मधली उत्कट विनंती
विरह , प्रेम , प्रणय , धुंदी , मादकता ह्या नेहेमीच्याच भावना ....
पण ओपीं साठी गाताना आशाच्या आवाजाला एक वेगळीच उंची प्राप्त होत असे .....
दोघांनी मिळून अनेक कलाकृतींचं सोनं केलं आहे .....
रागिणी मधलं किशोर कुमार आणि आशाने गायलेलं भन्नाट विनोदी
“मै बंगाली छोकरा” आणि
“चना जोर गरम बाबू” ही हलकीफुलकी विनोदी गीते ऐकल्यावर कळतं की प्रणयी गाण्यांप्रमाणेच मिश्कील खट्याळ गाणी हा सुद्धा ओपींचा forte होता .....
“अब तो जी होने लगा किसीकी नजर का सामना”
“चल दिये बंदा नवाझ“
“अच्छा जी माफ करदो थोडा इन्साफ करदो“
“हमदम मेरे खेल न जानो“
सारखी अनेक छेडछाड टाईप खोडकर गाणी ओपींनी आपल्या युनिक स्टाईल मध्ये बनवली ....
ओपींनी मोहम्मद रफीला सुद्धा एक से एक लाजवाब गाणी दिली ...
“जवानियाँ ये मस्त मस्त बिन पिये”
“हमदम मेरे मन भी जाओ”
“आपके हसीन रुख पे आज”
“न जाने क्यू हमारे दिलको तुने”
पण जेव्हा ह्याच रफी बरोबर बेबनाव झाला तेव्हा महेंद्र कपूरला घेऊन
“मेरा प्यार वो है के मरके”
“मेरी जान तुम पे सदके”
“आँखो में कयामत का काजल”
अशी बेहतरीन गाणी देऊन ती तितक्याच सहजतेने लोकप्रिय करून दाखवली .
लता ऐवजी आशा , रफी ऐवजी महेंद्र कपूरला घेऊन ओपींनी सिद्ध केलं की संगीताच्या दुनियेत कोणीही indispensable नसतं.
ओपींच्या रोमांटीक गीतांनी अनेक नवीन अभिनेत्यांची करीयर घडवली म्हटलं तर वावगं ठरणार नाही ....
‘मुझे देखकर आपका मुस्कुराना” आणि
“दिल कि आवाज भी सुन” मधला जॉय मुखर्जी ....
“पुकारता चला हुँ मै” आणि “लाखो है यहा दिलवाले” मधला विश्वजीत ....
“ ये चाँद सा रोशन चेहरा” आणि “कहीं न कहीं दिल लगाना पडेगा” मधला एव्हर ग्रीन शम्मी कपूर ....
या सर्वांची चोकॉलेट हिरोची इमेज बनविण्यात ओपींचा फार मोठा वाटा आहे .
“मै सोया अँखिया मिचे” आणि
“एक परदेशी मेरा दिल ले गया”
म्हणायला लावून भारत भूषणला देखील ओपींनी कधी नव्हे ते तरुण बनवलं ....
ओपींच्या संगीतातून कोवळं उत्साही तारुण्य झळकायचं म्हणूनच
“आपके हसीन रुख पे आज नया नूर है” म्हणताना अगदी रांगडा धर्मेंद्र देखील हळवा दिसतो .....
धीरगंभीर भावूक भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुरु दत्तलाही
“ऐ जी दिल पर हुआ ऐसा जादू” ,
“मै खो गया यही कही”
“सुन सुन सुन सुन जालीमा” सारखी उडत्या चालीची बहारदार गाणी ओपींनी दिली ....
“जाने कहा मेरा जिगर गया जी”
“सुनो सुनो मिस चटर्जी”
“मै बंबई का बाबू” अशी विनोदी गाणी मिळूनही जॉनी वॉकर हिरो मटेरियल वाटतो तो ओपींच्या खास स्टाईल मुळेच ....
ओपींची प्रणयी युगलगीते म्हणजे जणू प्राजक्ताची हळुवार पाखरण ..... चाफ्याचा घमघमणारा सुगंधी दरवळ .....
"सोने कि चिडीया" सारख्या गंभीर चित्रपटात देखील त्यांनी तलत मेहमूद आणि आशा भोसलेच्या आवाजातील
"सच बता तू मुझपे फिदा" आणि
"प्यार पर बस तो नही"
ही दोन अविस्मरणीय गाणी दिली .....
“उधर तुम हसीन हो इधर”
“उडे जब जब झुल्फे तेरी”
“ये मेरे हाथ में तेरा हाथ”
“नाजनी बडा रंगी है वादा तेरा”
“देखके तेरी नजर बेकरार हो गये”
अशी अगणित अवीट गोडीची युगल गीते ओपींनी दिली ....
अस वाचनात आलं की कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेतलेल्या ओपींनी रागिणी चित्रपटात
“मन मोरा बावरा” आणि “छोटासा बालमा” ही दोन अप्रतिम गाणी तिलंग रागात बांधली आहेत ....
तसच "फागुन" चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी त्यांनी पिलू रागात बांधली ... यातील
“एक परदेसी मेरा दिल ले गया"
"तुम रूठ के मत जाना"
"जानु जानु रे काहे खनके है"
"मैं सोया अँखिया मिचे"
ही गीते आजही लोकप्रिय आहेत.
ओपींच्या गाण्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिध्द घोड्यांच्या टापांचा ठेका .....
“बंदा परवर थाम लो जिगर”
“माँग के साथ तुम्हारा”
“पिया पिया पिया मोरा जिया पुकारे”
“यु तो हमने लाख हंसी देखे है”
“जरा हौले हौले चलो मोरे साजना”
पण म्हणून ओपींनी गंभीर , अर्थपूर्ण संगीत बनवलेच नाही असे नाही ....
“वो हँस के मिले हमसे हम प्यार समझ बैठे”
“है दुनिया उसीकी जमाना उसीका”
“आना है तो आ राह में”
“तुकडे है मेरे दिल के”
ही दर्दभरी गाणी ऐकताना त्याची खात्री पटते.
“थोडासा दिल लगा कर देख” मुसाफिरखाना चित्रपटातल्या रफी आणि शमशादच्या ह्या युगल गीतात रफीच्या आवाजाचा वापर वाद्या सारखा कलात्मकतेने करणारे ओपी बहुतेक एकमेव संगीतकार असतील ....
आयुष्यभर ओ पी नय्यर स्वतःच्या मतांशी प्रामाणिक राहिले ....
त्यांची मत बरोबर होती की नाही हे ठरवायची आपली योग्यता नाही .
पण एवढं मात्र खरं की त्यांनी कधीच आपल्या तत्वांशी समझोता केला नाही .
ज्यांच्याशी पटलं त्यांना बरोबर घेऊन आणि ज्यांच्याशी नाही पटलं त्यांना सोडून ओपी पुढे जात राहिले ....
उघडपणे कोणाही समोर त्यांनी कधीच हार मानली नाही .
पण त्यांच्या याच हट्टी स्वभावामुळे शेवटी शेवटी मात्र ते एकटे पडले
“चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पीछे छुटा राही चल अकेला”
ह्या गाण्याला चाल लावताना ओपींच्या मनात असंच काही आलं असेल का ?
अगदी ज्या आशा बरोबर ओपींचे मनापासून सूर जुळले होते तिच्यासामोरही ते शेवटपर्यंत नमले नाहीत . पण आशा बरोबरच्या बेबनावा नंतर ओपीच्या संगीतातील जादू निघून गेली हे सत्य मात्र कोणीही नाकारू शकत नाही .
"तुम रूठ के मत जाना
मुझसे क्या शिकवा
दिवाना हुं दिवाना" ....
असं मनातल्या मनात म्हणत ओपींनी आशाला विनवलं असेल का ?
की मग त्याचं दोघांचं शेवटचं गाणं असलेल्या
"चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर
पीना तो पीने ना दिया" ....
मधुन ओपीनी आपलीच तक्रार मांडली ?
ह्या गाण्याविषयी एक किस्सा आहे – आशा आणि ओ पी नय्यर मध्ये झालेल्या बेबनावा मुळे हे गाणे आशा भोसलेने चित्रपटात घालू दिलं नाही ...
आणि तरीही त्या गाण्यासाठी आशाला १९७५ सालचा सर्वोत्कृष्ट गायिकेचे फिल्मफेयर पुरस्कार मिळाला ...
आशा भोसलेंनी पुरस्कार स्विकारायला नकार दिला ...
हे कळल्यावर ओपी स्वतः तो पुरस्कार स्विकारायला गेले आणि येताना वाटेत गाडी थांबवून तो पुरस्कार त्यांनी समुद्रात फेकून दिला ...
असे होते ओ पी नय्यर ..... अत्यंत मानी आणि मनस्वी .....
आणि म्हणूनच अनेक घाव सोसूनही कुणाही समोर न झुकणारे ....
बहुतेक नया दौर चित्रपटातलं
“दिल लेके दगा देंगे
यार है मतलब के
ये देंगे तो क्या देंगे“
यातलं वास्तव त्यांनी फार पूर्वीच जाणलं असावं ...
ज्या संगीत क्षेत्रात कोणत्याही गोष्टीला लता मंगेशकर ह्या नावाशिवाय पूर्णताच येत नाही त्याच क्षेत्रात ओपींनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत लताच्या भरभक्कम स्वराच्या आधारा शिवाय आपली गुढी नुसतीच रोवली नाही तर जवळ जवळ ३ दशके उत्कृष्ट संगीत देऊन ती गुढी दिमाखाने मिरवली देखील .
हे असे धाडस फक्त ओ पी नय्यर हे एकमेव संगीतकारच करू शकले .....
आणि म्हणूनच ह्या निधड्या छातीच्या संगीतकाराला
“यु तो हमने लाख हंसी देखे है
तुमसा नाही देखा”
असा मानाच कुर्निसात करावसा वाटतो .....
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा